ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड !

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर.

 

माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील,भूमिपुत्र असलेले, तथा मुंबई मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून बसलेले,मनमिळाऊ स्वभावाचे, गोरगरिबांच्या हक्कासाठी,अहोरात्र झटणारे,आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य बिंबवणारे,तरुण पिढीचे प्रेरणास्थान, जनसेवालाच ईश्वर सेवा मानणारे, प्रशांत राठोड.. सध्या कार्यालयीन रजेवर असल्याने, किनवट माहूर तालुक्यातील बहुतांश गावाला भेटी देऊन जन माणसांच्या मनावर अधिराज्य बिंबवत आहे.त्यामुळे जनतेचाही प्रशांत राठोड यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावोगावी,तांडा वस्ती, तथा शहरी भागातही त्यांचं मोठ्या उत्साहाने गावकऱ्याकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. गोरगरिबाचे लग्न असो अथवा दुःखद घटना असो. तथा गावकऱ्यांची कुठलीही समस्या असो.प्रशांत राठोड हे न चुकता त्या ठिकाणी हजेरी लावत आहे. त्यामुळे किनवट माहूर तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांना भरभरून आशीर्वाद दिल्या जात आहे.जणू नुकतेच निधन झालेले माजी आमदार प्रदीप जी नाईक साहेब (भाया.) प्रशांत राठोड यांच्या देहरुपात लाभल्याचा भास किनवट माहूर तालुक्यातील जनतेस होत असल्याची चर्चा आहे.प्रशांत राठोड या नावाची स्तुती करण्यासाठी अक्षरशा शब्द अपुरे पडावे,परंतु त्यांच्या जनहित कार्याची सूची संपणार नाही.अशी स्थिती माहूर किनवट तालुक्यातील जनतेसमोर झाली आहे.एकीकडे एप्रिल महिन्यापासूनच सूर्य आग ओकत आहे.त्यामुळे जनमानसासह वन्यप्राणी तथा वन्य पशुपक्षी पाण्यासाठी वनवन भटकंती करीत आहे.या गंभीर बाबीची दखल घेऊन,प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठान चे पदाधिकारी ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावात टँकरने पाणीपुरवठा करत आहे. सोबतच जंगलात कृत्रिम पानवटे तयार करून वन्य प्राण्यांसाठी टँकरद्वारे त्या कृत्रिम पानवट्यामध्ये पाणी सोडण्याचे काम सुद्धा अविरतपणे चालू आहे. यासह आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, आगीत घर जळालेल्या कुटुंबांना, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना, सुशिक्षित बेरोजगारांना, अनाथ मुलींना विवाहासाठी, तथा अनेक दिन दुबळ्यांना प्रशांत भाऊ यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने भरभरून मदत करण्याचे काम सुद्धा चालू आहे. एवढ्यावरच न थांबता वेळेतून वेळ काढून स्वतः जनतेच्या अडीअडचणी बाबत प्रत्यक्ष जाऊन आढावा घेत आहे. त्यामुळे किनवट माहूर तालुक्यात त्यांचा जनसंपर्क भक्कमपणे वाढला असून,प्रत्येक गावागावात तांड्यात वस्ती वाढीत सुद्धा त्यांचं मित्र मंडळ तयार झालेला आहे. किनवट माहूर तालुक्यातील जे काम आजी माजी लोकप्रतिनिधींना जमले नाही,ते काम प्रशांत राठोड आपले शासकीय कार्य करून,उर्वरित वेळेत थेट करताना दिसत आहे. किनवट माहूर तालुक्यातील काही गाव खेड्यात तर प्रशांत राठोड हेच आमचे आमदार असल्याचेही सांगून दाखवतात.गेली तीस वर्षापासून सेवा संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने जनहित उपयोगी उपक्रम राबविले जात आहे. तेही कुठलाही राजकीय लाभ अथवा आर्थिक लालसा न बाळगता. अद्यापही निस्वार्थ आणि अविरतपणे अशा प्रकाराचे उपक्रम राबविल्या जाणार मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत जनसामान्यासह वन्य प्राण्यांची व पशुपक्ष्यांची सेवा करणार. असे लोकांना संबोधित करताना ते आपल्या भाषणातून आवर्जून सांगतात.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *