वायफनी येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे विविधमागणीची निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना पिंटू पाटील यांनि दिले निवेदन.
नांदेड प्रतिनिधी: माहूर तालुक्यातील वायफनी गावामध्ये जो मनिराम थड प्रकल्प सहा वर्षापासून सुरू झालेला आहे त्या प्रकल्पांमध्ये जे बाधित शेतकरी आहे त्यांची जमीन अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वे मुळे अधिग्रहण करताना विसरलेले आहे आणि अतिरिक्त पाणी शेतात प्रकल्पाचे पाणी जात असल्याबाबतचे वेळोवेळी निवेदन आमरण उपोषण जलसमाधी आंदोलन केलेले असून तरी प्रत्येक वेळी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे तरी नवीन आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला यांना सविस्तर निवेदनाद्वारे सांगून चर्चा केली व त्यांनी पाठपुरावा पूर्ण करतो असे आश्वासन दिले प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी मोठ आंदोलन करन्याची व शेतकरी आत्महत्या होऊ नये शेतकऱ्याचा अंत आता शासनाने बघू नये असा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे निवेदनावर पिंटू पाटील वायफनि आशिष कदम बालाजी गायकवाड नामदेव जाधव शोभा बाई गायकवाड दयानंद लोखंडे इंदिरा जाधव भास्कर पाटील निकेश जाधव आदीच्या स्वाक्षरा केल्या आहेत.



