महागाव शहरातील एकमेव गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गॅस वितरणातील गंभीर अनियमितता उघडकीस येत आहे. शासनाने दरवाजापर्यंत (द्वारपोच) गॅस पुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून्यही गॅस मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. १६ एप्रिल रोजी तर बेट एका शेतामध्ये गॅसचे वाटप करण्यात आल्याची धक्काहायक बाब उघड झाली.सध्या तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना नागरिकांना कोणतीही सोव, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसताना उन्हात उभे राहावे लागत आहे. यामुळे
उम्माभातासाला गंभीर प्रकारांगा धोका निर्माण झाला आहे. सम्मान, नागरिकांनी अनेक वेळा लेखी, लोडी स च दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित एजन्सीकडून कोणतीही ठोस
पखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. आधीच गॅसया तुटवडा, त्यात अशी उलगजी सेवा सामान्य व गरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, अशी संतमा प्रतिक्रिया एका ग्राहकाने बोलतानादिली. याहून गंभीर बाब मागते, एजन्सीतील काही कर्मधारी ग्राहकांशी उद्धटपणे वागतात,फोन उचलत नाहीत आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करतात, अखा आरोपही अनेकांनी केला आहे. शहरात एकच एजन्सी असल्यामुळे आम्हाला पर्याय नाही, त्या हा त्रास सहन करावा लागतो, आती खंतही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, संबंधित प्रकरणों प्रशासनाने एजन्सी संचालकांना खुलासा सादर करण्याचे आदेश विले आहे. दैनंदिन बुकिंग व गैस मागणीची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. तरीही, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असो.




