माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.
श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड.. शेकापूर..
शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात येते. या पंचायत विकास निर्देशांक करण्यात माहूर तालुक्यातील मौजे लांजी अग्रेसर ठरली आहे. राज्यभरातील अवल 25 ग्रामपंचायत पैकी लांजी ग्रामपंचायतने 14 वा क्रमांक पटकावला आहे. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, मीनल करणवाल. यांच्या नेतृत्वात सरपंच मारुती रेकुलवार,ग्रामसेवक गजलवार, तथा ग्रामपंचायत सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केंद्र शासनाने गावाची समृद्धी वाढविण्यासाठी शाश्वत विकासाच्या कामावर भर देण्याचे निर्देश दिले आहे. या माध्यमातून नऊसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, हरित स्वच्छ गाव, पायाभूत सुविधाणे युक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशानगाव, महिला स्नेही गाव, आदीचा समावेश असणार आहे.
यावरच ग्रामपंचायतचा विकास निर्देशांक (पी डी आय) ठरविण्यात आले आहे.
यात राज्यात 25 ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून, यामध्ये माहूर तालुक्यातील मौजे लांजी ग्रामपंचायतचा 14 वा क्रमांक आहे. ही कामगिरी साध्य करताना पंचायत विकास निर्देशांकासाठी सोळा विभागामार्फत संकलित झालेला प्रार्थमिक डाटा ग्रामसभेमार्फत प्रमाणित करण्यात आला. त्यानंतर तालुका, जिल्हा, व राज्यस्तरावरून तपासणी होऊन अंतिम तो मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत गट अधिकारी, विभागीय नोडल अधिकारी, तसेच ग्रामसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल.यांच्या मार्गदर्शनात लांजी या गावाच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या असून केवळ योजनाच नाही तर ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य , सार्वजनिक सुविधा, महिलांची प्रगती, तसेच शिक्षण, कचरा आणि सांडपाण्याचे उत्तम नियोजन यावर मागील काही महिन्यापासून सर्वच काम केल्या जात आहे. आता याच कामावर पंचायत विकास ठरविण्यात आले आहे.