बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेले असताना सक्तीचे चालु असलेले विज बिल व महसुली कर वसुली थाबवा* *शंकर महाजन याची मागणी
नांदेड, बिलोली /एस.के. चांद यांची बातमी
बिलोली तालुक्याती शेतकरी अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत.त्यातच शासना कडुन आर्थिक आनुदान हि अंत्यत तुटपुज्या स्वरुपात देण्यात आले व विमा कंपनी तर विमा मंजुर करुन विमा परताव करताना शेतकर्याची एक प्रकारची चेष्टाच केली आहे. हे सर्व शेतकरी बांधव सहन करत असताना मधेच सक्तीने विज बिल वसुली व महसुली कर वसुली चालु केल्यामुळे शेतकरी पुर्ण ता हातबल झाले आहेत. शासन एका हतान तटपूंजी मदत देयाच व दुसर्या हाताने दाम दुप्पट ( विज बिल व महसुली कर च्या माध्यमातुन) शेतकरी बांधवान कडुन काढुन घेयाच या शासकीय धोरना मुळे शेतकर्या समोर आत्महंत्या शिवाय पर्याय उरलेल नाही.असे निवेदन ईमेल द्वारे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी जिल्हाधिकारी, मुख्यमंञी,
विभागीय आयुक्त,औरगाबाद,
उपजिल्हाधिकारी,
तहसिलदार,पोलीस निरीक्षक,बिलोली याना दिले तसेच यामुळे सक्तीचे विज बिल वसुली व महसुली कर वसुली त्वरीत थांबवावे असा ईशारा दिले.सक्तीची वसुली न थाबवल्यास पुढील काळात शेतकर्याना सोबत घेउन वंचित बहुजन आघांडी हातात लाठ्या काट्या घेउन सक्तीचे वसुली करणार्या व विज कनेक्शन कट करनार्या आधिकार्याना उत्तर देण्यात येईल. यात कायदा व सुवेवस्था प्रक्ष्न निर्मान झाल्यास सर्वस्वी आपन व आपले प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी दिला आहे.