ताज्या घडामोडी

उमरखेड/ चातारी येथे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी दुसरा दिवस

उमरखेड/ चातारी येथे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी दुसरा दिवस

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट

 

उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेंतर्गत पासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी उमरखेड तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्य मध्यवर्ती बँक चातारी येथे दि.25/4/2022 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पण आमरण उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला असून सुद्धा प्रशासकीय अधिकारी यांच्या कडून दखल घेतली नाही मागच्या भाजप सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली पण या कर्जमाफी योजनेत उमरखेड तालुक्यातील बरेचशे शेतकरी वंचित ठेवण्यात आले आहे . नौतर पुन्हा महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन झाले व त्यांनी सुध्दा दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली पण यामध्ये सुध्दा उमरखेड तालुक्यातील शेतकरी वंचित ठेवण्यात आले यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल माने यांनी उमरखेड तालुक्यातील वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री मा.उध्दव साहेब ठाकरे यांना सतत पाठपुरावा केला पण आजपर्यंत उमरखेड तालुक्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला पण आजपर्यंत उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्यात आली नाही . येत्या आठवड्यात उमरखेड तालुक्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नाही दिली तर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल उपोषण कर्ते गणेशराव कदम. शामराव लुम्दे. भीमराव कदम. जयवंतराव कदम. वामन म.कदम.अशोक कदम. या उपोषण कर्त्यांनी दिले आवाहन

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *